हिंगोली - जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयातील ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर चाचणी करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनिवार्य केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग कायदा लागू केला आहे.जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे.त्यानुसार आता शासकीय व खाजगी रुग्णालयातील ओपीडी अर्थात बाहय रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची व हिंगोली, वसमततालुक्यातील खाजगी रुग्णालयातरुग्णांची अँटीजन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट घेणे बंधनकारक केली आहे.ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णास कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.ज्या रुग्णामध्ये लक्षणे दिसून येत असल्यास त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करावी तर ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत अश्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.