रात्री १२ नंतरही सभापती पंचायत समितीत ठाण मांडून......
प्रमोद नादरे
डीएम रिपोर्ट्स/ वसमत- हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण या वसमत येथील पंचायत समितीत दिनांक १४ जुलै २०२० रोजी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल सुरोसे पंचायत समितीत उपस्थित होते. सभापती रत्नमाला चव्हाण यांनी गट विकास अधिकारी सुरोशे यांना शालेयसंबंधी कामाबद्दल विचारणा केली असता; दोनच मिनिटात बाहेर जाऊन येतो असे सांगत सुरोसे पंचायत समितीतून निघून गेले ते पुन्हा परत आले नाहीत. त्यांची वाट पाहत सभापती रत्नमाला चव्हाण रात्री तब्बल १२ वाजेपर्यंत पंचायत समिती तिथेच ठाण मांडून होत्या.
हे ही वाचा.... वसमत प्रकरणात बीडीओंनी केला ५ लाख रुपये मागितल्याचा गंभीर आरोप...
तर गट विकास अधिकारी हे विठ्ठल सुरवसे यांना चव्हाण यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी फोन केले असता माझा बीपी खूप वाढला आहे असे सांगून त्यांनी पंचायत समितीत परत येण्याचे टाळले. सुरोशे यांना पंचायत समितीत न येण्यासाठी आणि सभापती रत्नमाला चव्हाण यांना समाधानकारक उत्तर न देण्यासारखे घडले तरी काय हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे? रात्री उशिरापर्यंत सभापती चव्हाण या पंचायत समितीच्या चुकून बसून होत्या तर सुरसे बेपत्ता झाले होते. त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता रात्री साडेबारा वाजता त्यांचा मोबाईल चालू होता. परंतु त्यांनी प्रतिसाद मात्र दिला नाही.